"हा' मंत्री 47 दिवस लढताेय रस्त्यावर!

karad
karad

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळात 60 दिवसांतील तब्बल 47 दिवस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढणाऱ्या योद्‌ध्यांचा आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच जनतेलाही धीर देत होते. आपल्याकडील विविध खात्यांचे कामकाज पाहात जिल्ह्याबरोबरच पालकत्व घेतलेल्या वाशिमवरही नजर ठेवून होते. मंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलेल्या दोन महिन्यांतील कामकाजाच्या आढाव्यातून एका लोकप्रतिनिधीने धाडसाने लढलेली लढाई समोर आली आहे. 

कोरोनाचा फैलाव वाढत असताना स्वतःला घरात कोंडून न घेता मंत्री शंभूराज देसाई यांनी रस्त्यावर उतरलेल्या योद्‌ध्यात आणि गावागावांतील भयभीत जनतेत मिसळून त्यांना धीर व आत्मविश्वास देणे पसंद केले. 22 मार्चला सुरू झालेल्या लॉकडाउनपासून 60 दिवसांत त्यांनी दररोज केलेल्या कामांचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. दोन महिन्यांत पाटण मतदारसंघासह सातारा, वाशिम व राज्यातील इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध अडीअडचणी सोडविण्याकरिता व कोरोनावर नियंत्रण आणण्याकरिता केलेल्या कामांचा तपशीलच या अहवालात त्यांनी दिला आहे. 

कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे अहोरात्र घेत असलेल्या कष्टाबद्दल अहवालाच्या प्रारंभीच उल्लेख करून तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे देसाईंनी नमूद केले आहे. आपण वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार पाटण मतदारसंघासह सातारा व वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, जनता यांना बरोबर घेऊन कोरोना संकटाचा सामना करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत. कोरोना काळात बाहेरगावांहून येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही कोरोनावर नियंत्रण आणण्यास आम्हास यश मिळाले आहे. आपल्या सूचना तळागाळातील लोकापर्यंत पोचविल्यामुळे व संकटावर मात करण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच हे सर्व शक्‍य झाल्याचाही त्यात उल्लेख आहे. 

दोन महिन्यांतील 60 दिवसांमध्ये किमान 47 दिवसांत सातारा व वाशिम जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कोरोनाशी लढण्याचे योग्य नियोजन केले. या 47 दिवसांत दररोज रस्त्यावर उतरून सर्वांना बरोबर घेत कोरोनाच्या संकटाशी लढण्याबरोबरच जनतेला जीवनावश्‍यक वस्तू वेळेत मिळण्यासाठी नियोजन केले. राज्यातील इतर जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या-ज्या अडीअडचणी माझ्यापर्यंत आल्या, त्या सर्व अडीअडचणी हिरीरीने सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक वगळता दोन महिन्यांच्या काळात गृह विभागातील पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यामुळे राज्यातील जनतेला कोणताही त्रास झाला नसल्याचेही त्यांनी अहवालात आवर्जून नमूद केले आहे. 


जनतेचे तेच माझेही सुख-दुःख आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सुरवातीपासूनच प्रत्येक प्रसंगात त्यांच्या सोबत आहे, मग सध्याच्या कठीण परिस्थितीत मी पाठीमागे कसा हटेन.? 

- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com