दळणवळणाचा प्रश्‍न; तरीही पुलाकडे दुर्लक्ष

jawali
jawali

केळघर (जि. सातारा) ः नांदगणे ते बोंडारवाडी दरम्यान दहा ते 12 गावांना जोडणाऱ्या पुनवडी येथील फरशी पुलाची उंची वाढवण्याची आवश्‍यकता आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

नांदगणे ते बोंडारवाडी दरम्यान रस्त्यावर पुनवडी येथे फरशी पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून संततधार पावसाने दरवर्षी या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पुलावरून पाणी गेल्याने 10 ते 12 गावातील लोकांचा मेढा, केळघरच्या बाजारपेठेशी संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे आवश्‍यक आहे. या रस्त्यालाही ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून पावसाळ्यात वाहने चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. बांधकाम विभागाने धोकादायक ठरू पाहणाऱ्या पुनवडी येथील फरशी पुलाविषयी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com