

सातारा: सात दिवस गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर सातारकरांनी प्रथेप्रमाणे गौरीसह गणेशाला भक्तिपूर्ण वातावरणात पुढल्या वर्षी लवकर या... अशी भावनिक साद घालत निरोप दिला. यानिमित्ताने सातारा शहरासह परिसरातील विसर्जनस्थळे गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती.