सातारा : ‘सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास’ ही टॅगलाइन घेऊन अविरतपणे कार्य करणाऱ्या मोदी सरकारच्या ११ वर्षांचा आढावा संस्मरणीय आणि आदर्श आहे. पुढील चार वर्षांत देशाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, माहिती आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन देश एक विकसित देश म्हणून विश्वभरारी घेईल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.