सातारा जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा; दुष्काळी भाग सुखावला

सातारा जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा; दुष्काळी भाग सुखावला

सातारा : सातारा जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांत 85 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांतील मुबलक पाणीसाठ्यामुळे टंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वाढलेले पर्जन्यमान चांगले राहिल्यामुळे धरणाची पाणी पातळी चांगली आहे. परतीचा पावसाने नुकसान झाले असले तरी धरणे तुडूंब भरून वाहिली आहेत. सर्व प्रमुख धरणातून मोठ्या पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. सध्या जिल्ह्यात सर्वच प्रमुख धरणांत 85 टक्‍क्‍यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात 96.87 टीएमसी म्हणजेच 92.03 टक्के पाणीसाठा आहे. हे उपलब्ध पाणी पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होण्यास उपयुक्त ठरण्याबरोबरच शेतीला देण्यास मदत होणार आहे.

कोयना धरणातून जवळपास 26 टीएमसी पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करावा लागला आहे. इतर प्रमुख धरणांतही पाणीसाठा मुबलक आहे. यामध्ये धोम 87.40 टक्के, कण्हेर 87.51 टक्के, उरमोडी 99.22 टक्के, तारळी 92.63, धोम-बलकवडी 96.27 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या वर्षी दुष्काळी तालुक्‍यातही चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील तलाव, जलसंधारणाच्या कामात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणातही मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने टंचाई भासण्याची शक्‍यता कमी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com