Raju shetti: सरकार कर्जमाफीपासून पळ का काढते?: राजू शेट्टी; अन्यथा ‘स्वाभिमानी’ करणार आंदोलन, शेतकऱ्यांनाच जाचक अटी

Satara News : मॉन्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून, तत्काळ पंचनामे व्हावेत. सध्या ६५ मिलिमीटर पावसावर अतिवृष्टीची नोंद होते. मात्र, दोन-चार दिवस सलग तेवढाच पाऊस पडल्यास होणारे नुकसान लक्षात घेतले जात नाही.
raju shetti
raju shettiSakal
Updated on

कऱ्हाड : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे महायुतीकडून निवडणुकीच्यावेळी आश्वासन देण्यात आले होते, मग आता ते पळ का काढते? उद्योजकांची कर्जे माफ करताना कुठली समिती लावली नाही, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच नियम, अटी का हव्यात? बुलेट ट्रेन व मेट्रोसाठी पैसे आहेत, मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com