India E-Waste : इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण करण्यात भारत तिसरा; केंद्राच्या माजी सल्लागाराची माहिती

शाश्‍वत कचरा व्‍यवस्‍थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र फायदेशीर ठरू शकते असे सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्‍या विविध पर्यावरण संवर्धन विषयक योजनांची माह‍ितीही जिंदल यांनी दिली.
India E-Waste
India E-WasteeSakal

India E-Waste Generation : पर्यावरणाच्‍या सर्व समस्‍या उपभोगवादाशी संबंधित आहे. पृथ्‍वीवरील स्‍त्रोतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताची लोकसंख्‍या झपाट्याने वाढत असल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. जगात प्लॅस्टिक कचरा निर्माण करण्‍यात भारताचा पाचवा तर ई-वेस्‍ट तयार करण्‍यात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदलाच्या माजी सल्लागार संचिता जिंदल यांनी दिली.

एल. ए. डी. आणि श्रीमती आर. पी. महिला महाविद्यालयात शनिवारी ‘ग्रीन अर्थ - क्लीन अर्थ’ विषयावर राष्ट्रीय परिषदेतील ‘वेस्‍ट मॅनेजमेंट फॉर क्लीन अँड ग्रीन अर्थ’ विषयावर त्या बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, विमेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. पूजा पाठक, उपप्राचार्य डॉ. किरण पाटील व डॉ. रिजूता बापट, संयोजक डॉ. दीपाली चहांदे यांची उपस्‍थ‍िती होती.

शाश्‍वत कचरा व्‍यवस्‍थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र फायदेशीर ठरू शकते असे सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्‍या विविध पर्यावरण संवर्धन विषयक योजनांची माह‍ितीही जिंदल यांनी दिली.

India E-Waste
कोणता देश फेकतो समुद्रात सर्वाधिक कचरा? आकडेवारी समोर

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. दुधे यांचेही भाषण झाले. पूजा पाठक यांनी स्‍वागतपर भाषण केले तर दीपाली चहांदे यांनी परिषदेच्‍या संकल्‍पनेसंदर्भात माहिती दिली. दुपारच्‍या ‍तांत्रिक सत्रांमध्‍ये डॉ. विशाल सरदेशपांडे, डॉ. राहुल राळेगावकर, डॉ. उत्तरा पांडे, मुकुंद पात्रीकर, प्रवीण मोते व डॉ. अनुपमा कुमार यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. तुतू सेनगुप्‍ता, डॉ. नंदा राठी, डॉ. संगीता सहस्‍त्रबुद्धे यांनी शोधनिबंध सादर केले.

समारोपाला नागपूर वन विभागाच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी अन्‍नाबथुला आणि विमेन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख उपस्‍थ‍ित होते. यावेळी तनवीर म‍िर्झा, आनंद भवाळकर व प्रशांत वानखेडे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. मृणालिनी ठोंबरे यांनी अहवाल सादर केला. मीनाक्षी कुळकर्णी यांनी संचालन केले तर संयो‍जक प्रचिती बगाडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com