

Raghav Chadha on Data Reset
Esakal
Raghav Chadha: राज्यसभा खासदार आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीवरून प्रश्न उपस्थित केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत राघव चड्ढा यांनी म्हटलं की, मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज डेटा मर्यादा असते. यात दीड जीबी, दोन जीबी किंवा ३ जीबी प्रतिदिन डेटा दिला जातो. तो दर २४ तासांनी रीसेट होते. वापर न होणारा डेटा अर्ध्या रात्रीच संपतो. वापरकर्त्यानं त्या डेटासाठी पूर्ण पैसे भरलेले असतात तरी वापर न झालेला डेटा रीसेट केला जातो. Why Does Data Reset at Midnight Raghav Chadha Slams Telecom Companies