Premium|Study Room : भारत-चीन संबंधांचा इतिहास आणि २१ व्या शतकातील आव्हाने

Asian Superpowers Geopolitical Conflict Analysis 2026 : 'हिंदी-चिनी भाई-भाई' ते १९६२ चे युद्ध आणि दलाई लामांचा आश्रय; ३,४८८ किलोमीटरची सामायिक सीमा लाभलेल्या भारत-चीनमधील ऐतिहासिक पंचशील करार व बदलत्या आव्हानात्मक राजनैतिक संबंधांचा सविस्तर वेध घेणारा विशेष लेख.
Asian Superpowers Geopolitical Conflict Analysis 2026

Asian Superpowers Geopolitical Conflict Analysis 2026

esakal

Updated on

लेखक - गौरव कुमार बाळे

भारत आणि चीन हे जगातील दोन सर्वात प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. आशिया खंडातील दोन महासत्ता म्हणून त्यांच्यातील संबंधांचा केवळ या क्षेत्रावरच नव्हे, तर जागतिक भू-राजकारणावर खोलवर परिणाम होतो. सुमारे ३,४८८ किलोमीटरची सामायिक सीमा लाभलेल्या या दोन देशांमधील नाते सध्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक वळणावर उभे आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वादाचे मूळ

भारत आणि चीनमधील संबंधांचा इतिहास पाहता, १९५० च्या दशकात ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ अशा घोषणांनी त्याची सुरुवात झाली होती. भारताने १९५० मध्ये चीनच्या जनवादी गणराज्याला (PRC) मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक म्हणून पुढाकार घेतला होता. १९५४ मध्ये दोन्ही देशांनी ‘पंचशील’ करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये परस्पर अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याची तत्त्वे मांडण्यात आली होती.

मात्र, १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात तिबेटचा मुद्दा आणि सीमा निश्चितीवरून तणाव निर्माण झाला. १९५९ मध्ये दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याने चीन संतप्त झाला. याचे पर्यावसान १९६२ च्या भारत-चीन युद्धात झाले. या युद्धामुळे दोन्ही देशांमधील विश्वासाला जो तडा गेला, तो आजही पूर्णपणे भरून निघालेला नाही. १९६२ नंतर अनेक दशके संबंध गोठलेले होते, परंतु १९८८ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चीन भेटीने संबंध सुधारण्याच्या दिशेने एक नवीन पर्व सुरू झाले, ज्यामध्ये सीमेवर शांतता राखत आर्थिक संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले.

Asian Superpowers Geopolitical Conflict Analysis 2026
Premium|Study Room : भारतीय सीमांचं रक्षण आणि वादांचं व्यवस्थापन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com