स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद हे दक्षिण भारतातील एक मोठे संस्थान होते. सध्याचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठवाडा एवढा प्रदेश या संस्थानामध्ये होता. तेथील लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू होती (८७%) तर त्याचा शासक निजाम उस्मान अली खान मुस्लिम होता, ज्याला मुस्लिम उच्चभ्रूंचा पाठिंबा होता. निजाम आणि इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (निजाम समर्थक मुस्लिम पक्ष) हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांना राज्य भारत आणि पाकिस्तानच्या बरोबरीने राहावे अशी इच्छा होती.