
लेखक : धनंजय बिजले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपने मतचोरी करून जिंकल्याचा गंभीर आरोप करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या मदतीला निवडणूक आयोग धावून जात असून त्यामुळे, ते सत्तेवर येत असल्याची टीका गांधी यांनी केली आहे.