उत्तर महाराष्ट्रात २५० शेतकरी आत्महत्या; ७८ शेतकरी मदतीस पात्र
नाशिक : जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील शासकीय मदतीला ७८ शेतकरी पात्र ठरले असून, ९८ शेतकरी अपात्र आहेत. ७४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची चौकशी बाकी आहे.
अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करताना सावकारी, सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक सामाजिक अडचणी, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. आत्महत्या केलेल्या २५० शेतकऱ्यांपैकी ९८ शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यासाठी जलद कार्यवाही सुरू केली असली तरी त्यामुळे ही कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. विभागात २०१५ पासून आजपर्यंत आत्महत्या केलेल्या दोन हजार ३३८ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. नाशिक ९, धुळे १३, नंदुरबार ३, जळगाव २०, नगर ५३ याप्रमाणे ९८ शेतकरी कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.