ग्रामपंचायत निवडणुका : जिल्ह्यात ४०४ उमेदवारी अर्ज अवैध; तर १६ हजार ६०२ उमेदवार पात्र

4Gram_panchayat_election.jpg
4Gram_panchayat_election.jpg

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण झाली. त्यात, ४०४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. येत्या सोमवार (ता. ४)पासून उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

१६ हजार ६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात

निवडणुकीसाठी १७ हजार सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून, गुरुवारी (ता. ३१) रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअंती ४०४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे सद्यःस्थितीत १६ हजार ६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, छाननीत आदिवासी इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व देवळा (१) हे तालुके वगळता इतर सगळ्याच तालुक्यांत उमेदवारी अर्ज अवैध ठरले. 

तालुका ग्रामपंचायती एकूण अर्ज अवैध उमेदवार 

इगतपुरी ०८ १४७ ०० १४७ 

त्र्यंबकेश्‍वर ०३ ५० ०० ५० 

देवळा ११ ३३९ ०१ ३३८ 

दिंडोरी ६० १,३१८ १७ १,३०१ 

येवला ६९ १,७८६ १३ १,७७३ 

बागलाण ४० १,१३५ ३० १,१०५ 

कळवण २९ ६०७ ०६ ६०१ 
सिन्नर १०० २,७२५ ८६ २,६३९ 

निफाड ६५ २,४४९ ४२ २,४०७ 

चांदवड ५३ १,१४९ ३४ १,११५ 

नांदगाव ५९ १,७१७ ३२ १,६८५ 

मालेगाव ९९ २,८११ १११ २,७०० 

नाशिक २५ ७७२ २७ ७४३ 

एकूण ६२१ १७,००६ ४०४ १६,६०२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com