तब्बल १६० वर्षांनंतर असा अधिकमासाचा योग! सर्वपित्री अमावस्येनंतर धार्मिक विधींना सुरवात 

adhik mas.jpg
adhik mas.jpg

नाशिक / पंचवटी : दर चार वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला हिंदुधर्मीयांत मोठे महत्त्व आहे. यंदा तब्बल १६० वर्षांनंतर लीप इयर आणि आश्विन अधिकमास एकत्र आल्याने या वर्षी आलेल्या अधिकमासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वी १८६० मध्ये असा अधिकमास आला होता. त्यानंतर असा योग आला आहे.

तब्बल १६० वर्षांनंतर लीप इयरमधील अधिकमासाचा योग 

शुक्रवार (ता. १८)पासून १६ ऑक्टोबरपर्यंत अधिकमास आहे.अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याला खूप महत्त्व आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी, जप-तप, होमहवन केले जाते. याशिवाय जावई तसेच भाच्याला वाण देण्याचीही परंपरा आहे. वाण देताना आपापल्या आर्थिक कुवतीनुसार सोने, चांदी, तांब्याच्या वस्तूंचे वाण स्वरूपात दान केले जाते. याशिवाय नवीन कपड्यांनाही महत्त्व आहे. याशिवाय जावईबापूंना अनारशांचा वाण देण्याची परंपरा आहे. सुवासिनींचे प्रतीक असलेल्या पायातील चांदीचे नवीन जोडवे करतात. याशिवाय पूर्वीच्याच चांदीच्या जोडव्यांमध्ये अधिक भर टाकून जोडवे करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपराही आजतागायत टिकून आहे. 

भगवान विष्णूचे आशीर्वाद 
अधिकमासाचे अधिष्ठाता भगवान विष्णू आहेत. त्यामुळे पूर्ण अधिकमास विष्णुदेवतेचा मंत्रजप केल्यामुळे विशेष लाभ होतो, असे सांगितले जाते. असे मानले जाते, की जो भक्त म्हणजेच साधक विष्णू मंत्राचा जप करतो, त्याला म्हणजेच साधकाला भगवान विष्णू स्वतःहून आशीर्वाद देतात. त्यांच्या पापांचे शमन करतात आणि विशेष महत्त्व म्हणजे त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात. 


अधिकमासामध्ये भगवान विष्णूच्या मंत्रजपाचे फळ १०० पटीने मिळते, असे सांगितले जाते. अधिकमासात खास ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप केल्यास अक्षय पुण्यफळ प्राप्त होते. -सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ  

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com