"...अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडू" शेतीप्रश्‍नांसाठी 'त्यांचा' तीन तास ठिय्या 

satana andolan 1.jpg
satana andolan 1.jpg

नाशिक/ सटाणा : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे तीन महिन्यांत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही शासनाने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.29) बागलाणच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन छेडले.

कांदा निर्यातीस प्रोत्साहन द्यावे 
शासनाने ज्या शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रासाठी पिकाची ऑनलाइन नोंद केली आहे, अशा शेतकऱ्यांचा सर्वच मका व कापूस खरेदी करावा तसेच शासनातर्फे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा मका व कापूस खरेदी होत नसेल तर त्या शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावानुसार मोबदला बॅंक खात्यात द्यावा. जिल्ह्यात व महाराष्ट्रात कांद्याचे दर खूप कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्वरित अनुदान व निर्यातीस प्रोत्साहन द्यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. 

रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा

सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पोचवण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रयत क्रांती संघटनेने आंदोलन मागे घेतले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा पगार यांनी दिला. या आंदोलनात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार, राज्य सरचिटणीस डोंगर पगार, भिका धोंडगे, रमेश अहिरे, मधुकर पगार, शरद पगार, नरेंद्र पगार, विशाल धोंडगे, चिंतामण शिरोळे, ज्ञानेश्‍वर पगार, वीरेंद्र पगार आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com