राष्ट्रवादीच्या माजी आमदार म्हणतात.."भाजपचे आंदोलन म्हणजे "नाचता येईना अंगण वाकडे'"

ncp n bjp 1.jpg
ncp n bjp 1.jpg

नाशिक / सटाणा : भारतीय जनता पक्षाचे "माझे अंगण माझे रणांगण' हे महाआघाडी सरकारच्या विरोधातील आंदोलन म्हणजे "नाचता येईना अंगण वाकडे' असे आहे. संकटाच्या काळात एकत्र राहून संकटांना परतवून लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे; परंतु सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीका माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे. 

शासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न
चव्हाण यांनी, महाविकास आघाडी सरकार कोरोनाविरोधात खंबीरपणे लढत असताना भाजप नेत्यांना घरच्या अंगणात आंदोलन करावे लागत आहे, हेच त्यांचे अपयश आहे. राज्यातील आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व महसूल विभाग हे चांगले काम करीत असताना विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने शासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाला हरवणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राजकारण न करता महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे भाजपने आपली ताकद उभी करावी व कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला परतवून लावण्यासाठी शासनाला सहकार्य करावे अन्यथा महाराष्ट्राची जनता भाजप नेत्यांना कधीही माफ करणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नसून त्याऐवजी सर्वांनी कोरोनाला हरविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com