लसूण, बटाट्याचे दर कडाडले! भाजीपाल्यांच्या दरात मात्र घसरण 

lasun and onion.jpg
lasun and onion.jpg

बिजोरसे (जि.नाशिक) : पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेलेच राहिल्यानंतर रब्बी हंगाम सुरू झाला. तरीही भाजीपाल्यांच्या दरात वाढ नसली तरी बटाटा व लसूणचे भाव मात्र वाढलेले आहेत. गहू या पीकातही गेल्या वर्षीपेक्षा हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना यंदा बसलेला आहे. त्यामुळे कोणते पीक घ्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. लसूण व बटाटा हे पण मोजकेच शेतकरी उत्पादन घेतात.

नामपूर, काटवन परिसरात भाजीपाल्यांच्या दरात मात्र घसरण ​

नाशिक जिल्हा द्राक्षे व कांद्यासाठी नावाजलेला; पण यंदा पावसामुळे अर्ली द्राक्षांवर फवारणी करून शेतकरी मेटाकुटीस आला. तसेच कांद्याच्या भावात चढ-उतार जास्त दिवस झाल्याने कांदा सडला. त्यामुळे दोन पैसे मिळतील, ही अपेक्षाही फोल ठरली. दुसऱ्या राज्यातून बटाटा आयात केला जातो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरात या ठिकाणीही पाऊस जास्त झाल्याने बटाटा उत्पादनात घट झाल्याने भाव त्याचे जास्त आहेत. 

वीस वर्षांत पहिल्यांदाच ५० रुपये किलो

आज लसूणचे भाव २२० रुपये किलो व बटाटा वीस वर्षांत पहिल्यांदाच ५० रुपये किलो दराने मिळत आहे. रब्बी हंगामात कसमादे पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे लागवड उशिरा झाली. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन कोथिंबीर व मेथीचे भाव स्थिर आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून आम्ही टोमॅटोचे उत्पादन घेत आहोत. मात्र उत्पन्न जास्त असल्याने दर घसरले आहेत. औषध फवारणीचे पैसे निघणे कठीण झाले आहे. कोणत्याच मालाची शाश्‍वती नाही व सरकारने हमीभाव द्यावा. -वसंत मोरे, शेतकरी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com