नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त घरोघरी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण उपवास करतात. महाराष्ट्रात या एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी जरी नाही करता आली तरीही उपवास तर मात्र हमखास असणारच...त्यातल्या त्यात यंदा साबूदाणा, शेंगदाणा, भगर, रताळ्याचे दर स्थिर असल्याने विठ्ठलभक्तांसाठी जरा दिलासा मिळणार आहे.
तयार पिठांनाही ग्राहकांकडून मागणी
गेल्या वर्षी साबूदाण्याचे भाव 80 रुपये किलो होते. यावर्षी 55 ते 70 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच शेंगदाणे, भगर, राजगिरा, खजूर, रताळे यांसारख्या पदार्थांच्या भावात मात्र वाढ किंवा घट झालेली नाही. या वर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने रेडिमेड उपवासाचे पदार्थ घेण्याऐवजी घरातच ते बनविण्याकडे महिलांचा कल असल्याचे चित्र आहे. रताळी विक्री करण्यासाठी ग्रामीण भागातून विक्रेते शहराच्या काही भागात दाखल झाले आहेत. तसेच राजगीरा पीठ, साबूदाणा पीठ, शिंगाडा पीठ, भगरीचे पीठ यांसारख्या तयार पिठांनाही ग्राहकांकडून मागणी होत आहे.
उपवासाच्या पदार्थांचे किलोचे दर (रुपयांत)
साबूदाणा : 55 ते 70
शेंगदाणे : 90 ते 110
भगर : 90
राजगिरा : 80
खजूर : 140 ते 260
रताळे : 60
आषाढी एकादशीनिमित्त भाविकांकडून उपवासाच्या पदार्थांना मागणी आहे. मात्र या सर्वच पदार्थांचे दर स्थिर आहेत. - विजय पटेल, शिवशक्ती ट्रेडिंग कंपनी, नाशिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.