दिव्यांग निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा; प्रहार संघटनेची मागणी

yeola.jpg
yeola.jpg

नाशिक : (येवला) शासनाने स्वतंत्रपणे निर्णय काढून ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी अपंगांच्या विकासावर खर्च करणे अनिवार्य केले आहे. असे असताना तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या निर्णयाला ठेंगा दिला असून, निधी खर्च केलेला नाही. हा निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. 

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन 

येवला तालुक्यातील आडसुरेगाव, आहेरवाडी, आंबेगाव, बाळापूर, भारम, बोकटे, देशमाने, धामोडे, डोंगरगाव, गवंडगाव, जळगाव नेऊर, कातरणी, खैरगव्हाण, मानोरी बुद्रुक, मुखेड, नागडे, नायगव्हाण, पारेगाव, पाटोदा, पुरणगाव, राजापूर, रेंडाळे, साताळी, शिरसगाव लौकी, सोमठाणदेश, सुरेगाव रस्ता, विसापूर या ग्रामपंचायतींनी नियमाप्रमाणे पाच टक्के दिव्यांग निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे निधी खर्च न करणाऱ्या या ग्रामपंचायतींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

तर प्रहार स्टाइलने तीव्र आंदोलन होईल

वारंवार पत्रव्यवहार करूनही या ग्रामपंचायतींवर कारवाई केली जात नसल्याने यापुढे जर मागणीची दखल घेतली नाही, तर प्रहार स्टाइलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल फरताळे यांनी दिला. प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, संपर्कप्रमुख सचिन पवार, गणेश लोहकरे, रामभाऊ नाईकवाडे, जनार्दन गोडसे, शंकर गायके, संजय मेंगाणे, गोरख निर्मळ आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com