प्रलंबित परीक्षांसाठी सरासरी गुण द्या.. स्टुडंट्स युनियनचा युजिसीला प्रस्ताव 

studant.
studant.

नंदुरबार ः महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी सेमिस्टर/ शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचे निराकरण करण्याबाबत केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) ई-मेलद्वारे प्रस्ताव सादर केला आहे. युनियने राज्याध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे हा प्रस्ताव दिला हे. 

आर्वजून पहा : "लॉकडाउन'मध्ये किचन "ऍक्‍टिव्ह मोड'वर... चटपटीत पदार्थांसह "हेल्दी फूड'ला प्राधान्य

प्रस्तावात म्हटले आहे की कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता युजीसीने परीक्षा आयोजित करण्यासाठी गुणांची शिफारस, गुणपत्रिका आणि उत्तीर्ण निकषांची शिफारस करण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील परीक्षेसंदर्भात विचार करताना विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्तीर्ण केलेल्या सर्व सेमेस्टरच्या गुणांची सरासरी विचारात घ्यावी. जेथे सरासरी गुण/ क्रेडिट गुण / ग्रेडच्या आधारे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा किंवा सेमिस्टर परीक्षा घेण्याऐवजी त्यांच्या अगोदरच्या सर्व सत्रांचे गुण एकत्रित करून त्यांची सरासरी करून वार्षिक परीक्षा किंवा पुढच्या सेमिस्टरसाठी गुण प्रदान करण्यात यावेत. परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आली तर शैक्षणिक वर्ष जुलै/ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये अधिक सहजतेने सुरू करण्यास विद्यापीठ आणि महाविद्यालये सक्षम होतील. 

सविस्तर प्रस्ताव असा  

मागील सर्व वर्षांची / सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून पुढील प्रलंबित परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करणे. पदवीधर अभ्यासक्रम (एटीकेटी विद्यार्थ्यांचा समावेश) त्यात वार्षिक परीक्षा पॅटर्नसाठी पदवीधर अभ्यासक्रमाच्या १ आणि २ वर्षाच्या गुणांची सरासरीची काढून तृतीय(अंतिम) वर्षाच्या प्रलंबित परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करणे. सेमिस्टर एंड परीक्षेसाठी पदवीधर अभ्यासक्रमाच्या १, ३ आणि ५ सेमिस्टरच्या गुणांची सरासरीची काढून आणि २,४ व ६ प्रलंबित सेमिस्टरसाठी सरासरी गुण प्रदान करणे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एटीकेटी विद्यार्थ्यांचा समावेश) सेमिस्टर एंड परीक्षेसाठी आधीच्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून प्रलंबित सेमेस्टरसाठी सरासरी गुण प्रदान करणे. 

शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणांकरिता युजीसीच्या कृती योजना २००९ नुसार विविध राज्ये विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आणि ग्रेडिंग सिस्टम, ९ पॉईंट पॉईंट स्केल आणि संचयीत ग्रेड पॉइंट स्कोअर लागू केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याने मिळविलेले सरासरी क्रेडिट पॉईंट आणि संचयित ग्रेड पॉईंट स्कोअर एकत्रित करून त्याची सरासरी काढून याआधारावर प्रलंबित परीक्षेसाठी गुण प्रदान करता येऊ शकतात. योग्यवेळी सेंट्रलाइज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस (CAP) आयोजित करणे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येऊ नये,कारण अंतिम वर्षाच्या गुणांवर गुणवत्ता यादी तयार केली जावी. सेंट्रलाइज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस (CAP) नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. 

परिक्षेबाबत घाईचा निर्णय नको 
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले,‘ बऱ्याच विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. परीक्षा आयोजित करण्याबाबत कोणताही घाईचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. केवळ परीक्षा महत्त्वाच्या नसून प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन, निकालाची घोषणा व पुढील वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही महत्त्वाची आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com