नाशिक : राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.३) जाहीर केला. या निर्णयाचे बहुतांश विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले. परंतु सोबतच पदवी अभ्यासक्रम प्रवेशाबाबत धोरण लवकर स्पष्ट करण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली.
(Rational decision regarding the degree admission process)
परीक्षा रद्द झाल्याने नाराजी
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना बारावीचे गुण व सीईटी परीक्षेच्या कामगिरीच्या आधारावर प्रवेश दिला जात असतो. परंतु आता बारावीची परीक्षा होणार नसल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तर्कसंगत निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द झाल्याने नाराजी व्यक्ती केली.
''बारावीची परीक्षा रद्द करून महाराष्ट्र सरकारने थोडासा दिलासा दिला आहे. परंतु बारावी नंतरचे व्यावसायिक व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे धोरण केंद्र पातळीवर स्पष्ट करावे. त्याशिवाय पालक-विद्यार्थी तणावमुक्त होणार नाहीत.''
- प्रा. डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.
''कोरोना परिस्थितीत विद्यापीठाकडून ऑनलाइन परिक्षा सुरु आहेत. काही परिक्षा पुढेही ढकलल्या आहेत. विद्यार्थी आरोग्यहितास राज्यशासन, शैक्षणिक संस्थांनी प्राधान्य दिले आहे. हेच लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेबाबत योग्य निर्णय झाला आहे. शैक्षणिक वर्षे सुरळीत झाल्यानंतर पुन्हा चांगला दर्जा व गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने, तसेच आशादायक वातावरणासाठी सर्वजण नक्की प्रयत्न करतील, यात शंका नाही.''
- डॉ. यु. वाय. कुलकर्णी, प्राचार्य, भोसला सैनिकी महाविद्यालय.
''काही दिवसांपासून परीक्षेबाबत माझ्यासह सर्वच मित्र चिंतेत होते. शासनाने परीक्षेबाबत निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतो.''
-देवरात साळवे, विद्यार्थी.
''गुणवत्ता टिकविण्याच्या दृष्टीने परीक्षा होणे आवश्यक होते. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शासनाने योग्य निर्णय घेतला. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही तणावाखाली होती, ही बाब नाकारता येणार नाही. आता पुढील प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.''
- संजय पोरजे, पालक.
''नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी बारावीचा गांभीर्याने अभ्यास घेतात. अशात बारावीची परीक्षाच न घेण्याचा निर्णय तर्कसंगत वाटत नाही. लेखी परीक्षा घेणे शक्य नसले तरी ऑनलाइन पर्यायाचा विचार व्हायला हवा होता. आता वैद्यकीय प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढायला नको, हीच अपेक्षा व्यक्त करतो.''
-देवांग जानी, पालक.
(Rational decision regarding the degree admission process)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.