
Nashik : 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी
कसबे सुकेणे (जि. नाशिक) : शिवसेना-भाजप (Shiv sena-BJP) सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना (Debt waiver scheme) सुरू केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील कर्ज भरावे. त्यानंतर उरलेल्या दोन लाखांवर कर्जमाफी दिली जात होती. आता ती दोन लाखांची कर्जमाफीची योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. (Demand for resumption of loan waiver scheme up to Rs 2 lakh Nashik News)
महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असला तरी या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. जे नियमित कर्जदार आहे, त्यांच्यासाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार होते. अद्याप ते दिलेले नसले तरी ते देण्याच्या दृष्टिकोनातून बँकांना आदेश दिल्याचे समजते. मात्र, त्यातही सलग तीन ते चार वर्षापासून कर्ज परतफेड करणारे शेतकरी असावे, अशी अट आहे. त्यामुळे या योजनेतही अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. कोरोनाकाळात अनेक शेतकरी बाजारभावामुळे अडचणीत आले. एका बाजूला महागाई असताना दुसरीकडे शेतीमालाचे भाव फारसे वाढले नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढल्याने शेतकऱ्यावर जितके कर्ज आहे, त्यापैकी दोन लाखांवरील कर्ज भरण्यास अनेक शेतकरी तयार आहेत. मात्र महाविकास आघाडीने दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा: नाशिक : खरिपामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग
"मौजे सुकेणे-कसबे सुकेणेतील अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत. दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी दोन लाखांवरील सर्व कर्ज भरण्यास तयार होतील. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होऊन ते कर्जमुक्त होतील."
- विजय मोगल, माजी उपसरपंच
हेही वाचा: नामपूर ते बेहेड रस्ता बनला मृत्युचा सापळा
Web Title: Demand For Resumption Of Loan Waiver Scheme Up To Rs 2 Lakh Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..