विमा कंपन्या नुकसानीची दखल घेईनात; ऐन दिवाळीत शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात 

Farmers will agitate
Farmers will agitate

नाशिक/काळूस्ते : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने २० ते २५ तारखे दरम्यान इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात भात शेतीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची विमा कंपन्या दखल घेत नसल्याने ऐन दिवाळीत इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

विमा कंपन्यां विरोधात शेतकरी महामार्गावर धरणे आंदोलन करतील असा इशारा बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग शिंदे यांनी दिला.ऑक्टोबर अखेरपर्यंत ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई बाबत दावा केला असेल त्यांना पात्र ठरवून विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह विमा कंपनी प्रशासनाकडे केली आहे. त्यात, भारतीय जनरल विमा कंपनीची यंत्रणाही विस्कळीत होऊन टोल फ्री क्रमांकावर संपर्क करूनही फोन लागत नव्हते. मोबाईल टॉवरही बंद पडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या. विमा कंपनीकडून जनजागृतीही झाली नाही त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील पीक विमा धारक असंख्य शेतकरी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com