सीबीएससीप्रमाणे लावा बारावीचा निकाल; शिक्षणमंत्र्यांना पत्र

Twelfth-result
Twelfth-resultesakal

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) बारावीचा निकाल (12th result) लावण्यासाठी दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के आणि बारावीचे ४० टक्के गुण असे सूत्र स्वीकारले आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत नमूद केले. याचिकाकर्ते अथवा इतर कुणीही त्यावर विरोधी मत नोंदविले नाही. इतर सूत्र सुचविलेले नाही. त्यामुळे त्याच धर्तीवर राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात यावा, असे पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे. (HSC-result-should-be-given-as-per-CBSC-nashik-marathi-news)

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

राज्यातील बारावीचा निकाल कसा लावावा, त्यासाठी मूल्यमापन कसे करावे, कोणते निकष लावावेत यासंबंधाने शालेय शिक्षण विभागाने मते मागविली आहेत. त्याचअनुषंगाने महासंघाने पत्र लिहिल्याचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, की बारावीचा निकाल कसा लावावा याबद्दल मतमतांतरे व्यक्त होताहेत. काही जण बारावीच्या निकालासाठी अकरावी आणि बारावीचे गुण विचारात घ्यावेत, असे सांगताहेत. त्यासाठी ३०:७०, ४०:६०, ५०:५० टक्के गुण असेही सुचवले जात आहेत. हे सूत्र सरकारने स्वीकारल्यास त्यास न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळातच, ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांना साधनांअभावी यंदा ऑनलाइन शिक्षण पुरेशा प्रमाणात घेता आलेले नाही. प्रत्यक्ष अध्यापन कमी झाले आहे. त्यामुळे पुरेशा अध्यापनाअभावी यंदा विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळणार नाहीत. शिवाय अकरावीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. त्यामुळे अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे निकाल व्यक्ती, संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय साक्षेप असेल. या गुणांमध्ये परीक्षा आणि मूल्यमापनाचे थोडेसुद्धा समानीकरण असणार नाही.

विद्यार्थ्यांवर मूल्यमापनात कोणताही अन्याय होणार नाही

दहावीची शिक्षण मंडळाची परीक्षा झाली असल्याने त्या गुणांमुळे बारावीच्या निकालात सुसूत्रता राहण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांचा निकाल व्यक्तिनिष्ठ राहणार नाही. शिवाय सीबीएससीच्या धर्तीवर गुणांकन करताना बारावीच्या ४० गुणांमध्ये ३० गुण लेखीचे आणि १० गुण प्रात्यक्षिक अथवा तोंडी अथवा स्वाध्याय अथवा दैनंदिन अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवता येतील. राज्य मंडळाचे बारावीसाठी मूल्यमापन कला, वाणिज्यसाठी ८० अधिक २० आणि विज्ञानसाठी ७० अधिक ३० अशा स्वरूपाचे आहे. म्हणूनच ४० गुण ३०:१० अशा प्रमाणात परावर्तित केल्याने फार मोठा फरक पडणार नाही. विद्यार्थ्यांवर मूल्यमापनात कोणताही अन्याय होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Twelfth-result
गोदावरी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डंका इंग्लंडमध्ये!

दहावीसाठी राज्य सरकारने २८ मे २०२१ ला काढलेल्या आदेशानुसार खासगी विद्यार्थी, पुनपर्रीक्षा, तुरळक विषयाची परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे मूल्यमापन कसे करावे याबद्दल नमूद करण्यात आले. राज्य मंडळाने ९ जून २०२१ ला कार्यवाहीचे वेळापत्रक दिले. दुसऱ्या दिवसापासून मूल्यमापन सुरू झाले. त्यामुळे बारावी निकालासाठी निर्णय घेतल्यास जुलैअखेरपर्यंत निकाल लागल्याने ऑगस्टमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत. -प्रा. डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

Twelfth-result
70 पैसे लिटर पेट्रोल दराची पावती चर्चेत! जुनी आठवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com