नुकसानभरपाईत कुणावरही होणार नाही अन्याय - भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal


नाशिक : पूरग्रस्तांना समान मदत करण्याचे धोरण सरकारचे असून, नुकसानभरपाईमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली. तसेच सरकार अन्‌ प्रशासनाला सर्वांची काळजी असल्याचे सांगत त्यांनी (maharashtra rain) पूरग्रस्त अन्‌ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
जिल्ह्यातील काही भागात प्रचंड पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता. २८) रात्रीपासून सर्व सरकारी आणि निमसरकारी यंत्रणांशी समन्वयाने माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची नाशिकमधील मालेगाव स्टँड परिसरात भुजबळ यांनी पाहणी केली. महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि इतर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच निफाड आणि येवला तालुक्यातील नुकसानीची पाहणी भुजबळ यांनी केली.

chhagan bhujbal
वैद्यकीयच्‍या प्रवेशासाठी कागदपत्र ठेवा सज्‍ज


पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, की अनेक वर्षांपासून अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर येण्याचे प्रसंग वेळोवेळी उद्‌भवतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिका, महसूल, पोलिस, जलसंपदा विभाग कृती आराखड्याप्रमाणे काम करते. जिल्ह्यात कुठेही मनुष्यहानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. काही भागात दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले आहे. चार ते पाच जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव परिसरात रात्री मोठ्या प्रमाणावर पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, लासलगाव रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्ण, डॉक्टर, परिचारिका अडकून पडल्या होत्या. त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे रस्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे यंत्रणा हळूहळू पोहत आहे. अशाही परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

chhagan bhujbal
Nashik : तीन सदस्यांचे पॅनल तयार करण्याच्या हालचाली गतिमान


गोदावरी नदीला असलेली महापुराची पार्श्वभूमी पाहता नागरिकांनी अधिक सतर्क राहून स्वत:ची काळजी घ्यावी. पाऊस अजून संपलेला नाही. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग परिस्थितीनुसार हळूहळू सुरू आहे. महापालिका, महसूल, पोलिस, जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com