
नाशिक : अन्न-औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जगाला आवश्यकता असलेल्या औषधांपैकी ३५ टक्के औषधे उपलब्ध करुन दिली आहेत. त्यामध्ये नाशिकच्या फार्मास्युटिकल क्षेत्राचा समावेश आहे. मधल्या काळात निर्यात बंद असताना औषध कंपन्यांनी मागणीप्रमाणे उत्पादन करुन ठेवले. निर्यातीचा मार्ग मोकळा होऊ लागताच, निर्यात सुरु केली आहे. एवढेच नव्हे, तर काही कंपन्यांनी आपली उत्पादने स्थानिक बाजारपेठेकडे वळवली आहेत. चीन सीमेवरील तणावाच्या परिस्थितीत औषध कंपन्यांसाठी कच्च्या मालाचा प्रश्न उदभवलेला असताना ही गरज नाशिकमधील काही कंपन्यांनी भरुन काढली आहे. जवळपास पाच प्रकल्पांमधून कच्च्या मालाची निर्यात झाली आहे.
आल्कोहोल कामी आलं
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात नगर, नाशिक, जळगाव या साखर कारखान्यांच्या पट्यातील सतरा डिस्टलरींमधील ८५ लाख आल्कोहोलचा वापर सॅनिटायझरसाठी झाला. लॉकडाऊनमध्ये वाहने जागेवर उभी असल्याने पेट्रोलसाठी वापरण्यात येणारे इथेनॉलचा उपयोग सॅनिटायझरसाठी झाला आहे. स्थानिक गरजेनंतर हे सॅनिटायझर महाराष्ट्रात इतरत्र आणि इतर राज्यांमध्ये रवाना झाले.
फार्मास्युटिकल क्षेत्राच्या उत्पादन वृद्धीला हातभार
ॲलोपॅथी औषध उत्पादक मोठ्या कंपन्या दहा असून छोट्या आणि मध्यम क्षमतेच्या कंपन्यांची संख्या ६५ पर्यंत आहे. त्यातील तीन मोठ्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल ८ हजार कोटींच्यापुढे आहे. या कंपन्यांनी आपले उत्पादन क्षमता ७० टक्क्यांपर्यंत पोचवली आहे. याशिवाय आयुर्वेदिक ३० आणि कॉस्मेटिक बारा कंपन्या आहेत. या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल प्रत्येकी १ ते ५ कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्याचवेळी हँडग्लोज, मास्क याही उत्पादनाने फार्मास्युटिकल क्षेत्राच्या उत्पादन वृद्धीला हातभार लावलेला आहे.
आपत्तीच्या काळात ६० टक्क्यांवर उत्पादन
नाशिकच्या कारखानदारीने इलेक्ट्रीकल, आॅटोमोबाईल क्षेत्राला ‘बुस्ट' दिला. याच श्रृंखलेत फार्मास्युटिकल क्षेत्राचाही समावेश आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योगाची चाके बंद झाली होती. त्यानंतर आर्थिक गाडे रुळावर यावे म्हणून उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. आपत्तीच्या काळात मागणीनुसार सुरक्षेची सारी आव्हाने पेलत फार्मास्युटिकल क्षेत्राने आपले उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत पोचवण्यात यश मिळवले आहे. गेल्या सहा महिन्यात एकुण आर्थिक वर्षाच्या उलाढालीच्या तुलनेत निम्मी उलाढाल होणे अपेक्षित असताना त्यातुलनेत ६० टक्क्यांपर्यंतचे प्रमाण असल्याचे अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.