नामपूर- नाशिक येथील नातेवाईकांचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्या कारचा कळवणजवळ भीषण अपघात झाला. नामपूर येथील बधान कुटुंबीयांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यावर आदळली. .यामुळे झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह सहा जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वृत्तांमुळे नामपूर शहरावर शोककळा पसरली आहे..नामपूर येथील बधान कुटुंबीय नाशिक येथे नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी गेले होते. सोहळा आटोपून सटाणा येथे परतत असताना कार (क्र. एमएच ४१ बीई ५४४३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल जाऊन आदळली. ही धडक जबरदस्त होती की, बंगल्याबाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाकला गेला. अपघातामध्ये शैला वसंत बधान ( वय ६२), त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (५०), चालक खालिक मेहमूद पठाण (५०) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (वय ३२) आणि त्यांची मुलगी त्रिष्णा मेतकर (वय ५) उत्कर्ष मेतकर (वय १२).Pankaj Deshmukh : पंकज देशमुख जीव दिला नसून घातपातच; प्रसेनजीत पाटील यांनी केली सीआयडी चौकशीची मागणी.रा. देवळा हे ठार झाले. तर भालचंद्र बधान (वय ५२) रा. नामपूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांत शैला बधान व माधवी मेतकर या मायलेकी नून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे. या अपघातामुळे बधान आणि मेतकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.