धावपळीच्या युगातही आजही पारंपारिकेतला महत्व

tradition
traditionesakal

नरकोळ (जि. नाशिक): विवाह समारंभातील अनेक जुन्या प्रथा आजच्या धावपळीच्या जीवनात बंद पडतात की काय, अशी शंका सर्वांना येत होती. परंतु, जुन्या चालीरीतीला आता पूर्वीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे.

या प्रथेमुळे कुटुंबांमध्ये जिव्हाळा

या प्रथेमुळे नवीन विवाहबद्ध झालेल्या कुटुंबांमध्ये जिव्हाळा निर्माण होत आहे.
पुर्वी विवाह समारंभासाठी चार ते पाच दिवस महिला वधु- वराच्या गावी मुक्कामी जाऊन तेथे अनेक आठवणींना उजाळा मिळत. तसेच, एकमेकांमधील नातेसंबंध निघत. उपस्थित महिलांमध्ये पुरणपोळी बनविण्यासाठी कोणाची हातोटी जास्त आहे, हा कलागुण यातून पाहण्यास मिळत. परंतु, आजच्या धावपळीच्या जीवनात रेडिमेड पुरणपोळीला महत्व आल्यामुळे व एका दिवसातच हा कार्यक्रम पूर्ण होतो. यानिमित्ताने वर- वधुच्या काका- काकूंचे नाते अधिक घट्ट होत असते. दोन्ही बाजुंकडून नव्या साड्यांचे आहेर या निमित्ताने मिळतात.

tradition
विवाह समारंभात पारंपारिक वस्तूंचे महत्त्व आजही टिकून

काय आहे प्रथा
पूर्वी विवाह समारंभासाठी वर- वधुच्या घरी पंधरा दिवस लग्नाचा गजावजा चालत. सर्व नातेवाईक यासाठी मुक्कामी राहत. या कार्यक्रमाचा संपूर्ण त्रास घरातील महिलांना होत. लग्न समारंभानंतर विश्रांती म्हणून चुल पाहण्याच्या निमित्ताने चार- पाच दिवस जात. येथे वर- वधुच्या काका- काकूंकडे मुक्कामी राहत. या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु आहे.

tradition
विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या 'या' परंपरा द्रविडने केल्या पुन्हा सुरू

"लग्न समारंभानंतर चुल पाहणेही प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. या निमित्ताने नववर- वधुचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते. यातून महिलांच्या विचारांची देवाण- घेवाण होते."
- ललिता बच्छाव, प्राथमिक शिक्षिका, सटाणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com