पंचवटी : स्मार्ट सिटी अंतर्गत गंगाघाटावर विविध कामे सुरू आहेत. स्मार्ट प्रशासनातर्फेअहिल्यादेवी होळकर पुलाच्या वरील बाजूस (रामवाडी) नदीपात्रात मातीचा भराव टाकला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निशिकांत पगारे यांनी केला आहे. चुकीचे काम करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत श्री. पगारे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात स्मार्ट सिटी प्रशासनातर्फे रामवाडी परिसरातील अहिल्यादेवी होळकर पुलाच्या वरच्या बाजूला गोदावरी नदीपात्रात (Godavari river) मोठया प्रमाणावर मातीचा भराव टाकून नदी पात्र अरुंद करून गोदावरी नदीचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच ठिकाणी स्मार्ट सिटी प्रशासनाकडून गोदावरी नदीत निळ्या पूररेषेत बेकायदेशीररीत्या सिमेंट क्राँक्रीटची भिंत बांधलेली आहे. गोदावरी नदीपात्रात भराव टाकून नदी पात्र अरुंद करणाऱ्या स्मार्ट सिटी प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पत्राच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण महामंडळाला देण्यात आल्याचे श्री. पगारे यांनी सांगितले.
"नैसर्गिक साधनांची हानी करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणे म्हणजे स्मार्ट नाही तर पर्यावरणाचे रक्षण करत स्मार्ट कामे होणे अपेक्षित आहे."
-निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.