former mla Sanjay Chavan Urges CM Devendra Fadnavis
sakal
सटाणा - राज्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून नगदी पिकांना उत्पादन खर्चाइतकेही दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गेल्या वर्षी बंद केलेली 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करून बळीराजाला दिलासा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे.