नाशिक रोड : राजमाता ताराराणी यांनी संघर्ष करून मराठ्यांचे साम्राज्य उभे केले आहेत, त्या खऱ्या रणरागिणी होत्या. महिलांनी त्यांचा इतिहास अभ्यासून आत्मचिंतन करावे. राजमाता जिजाऊ व ताराराणी यांचे संस्कार विसरता कामा नये, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
नाशिक रोड येथे छत्रपती फाउंडेशनतर्फे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांची संतांच्या आणि महामानवांच्या ग्रंथांनी ग्रंथतुला आणि रणरागिनी गौरव आणि समाजगौरव पुरस्कार वितरण झाले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक गणेश कदम, अध्यक्ष सुप्रिया कदम, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, इंडियन सेक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, विभागीय अधिकारी दिलीप मेणकर, उद्योजक दीपक चंदे, सुमन कदम, करण गायकर, योगेश निसाळ, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष किशोर जाचक, बंटी भागवत, राजेश फोकणे, विक्रम कोठुळे, मंगेश मोरे, नरेश देसाई, श्रीकांत मगर, बापू सातपुते, दत्ता बच्छाव, नितीन चिडे, अश्विनी टिळे, पुष्पा जगताप आदी उपस्थित होते.
या वेळी संभाजी महाराज यांची ग्रंथतुला करण्यात आली. तसेच रणरागिणी गौरव आणि समाजगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. स्वागत सुप्रिया कदम यांनी केले. प्रास्ताविक गणेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन संतोष फसाटे, वरुण कदम, वैशाली मोजाड यांनी केले. आभार यश बच्छाव यांनी मानले. संयोजन ज्ञानेश्वर भोसले, वैशाली मोजाड, वरुण कदम, यश बच्छाव, तुषार भोसले, आशिष गोळे, संतोष टिळे, वसंत बरकले, समाधान वाकचौरे, अनिल पुरी, आकाश भोळे, नीलेश गुंजाळ, कृष्णा देशमुख, दीपक जाधव यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.