उपराजधानीतून २३ किसान रेल रवाना; संत्रा उत्पादकांना दिलासा; देशभरात शंभर फेऱ्या पूर्ण

22 Kisan rail departed from Nagpur
22 Kisan rail departed from Nagpur

नागपूर ः मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून आतापर्यंत २३ किसान रेल्वे दिल्ली व शालिमारला (कोलकाता) पाठविण्यात आल्या. त्यातून १४.६१ कोटींचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले. या सेवेमुळे संत्रा उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तब्बल १५ वर्षांनंतर रेल्वेतून संत्रा वाहतुकीची सुविधा किसान रेलमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. संत्र्यासह अन्य कृषी उत्पादने व नाशवंत साहित्य अन्य राज्यांमध्ये पाठविण्यासाठी ही सेवा लाभदायी ठरू लागली आहे. शेतकऱ्यांना कोणताही कृषीमाल पाठविण्यासाठी ५० टक्के सवलत दिली जात आहे. यामुळे वाहतुकीवरचा खर्च कमी झाला आहे. 

सोबतच कमी वेळेत माल नियोजित ठिकाणी पोहोचत असल्याने खराब होण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. मालाचा दर्जाही टिकून राहत असल्याने चांगला दरही मिळतो. केवळ ५ किलोपासून कितीही माल किसान रेल्वेतून पाठविणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. 

नागपूर विभागातून आतापर्यंत २३ किसान रेल्वेतून ४ हजार टनाहून अधिकचा माल दिल्ली व कोलकाताला पाठविण्यात आला. पुढील काळातही ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. देशातील पहिली किसान रेल ८ ऑगस्ट २०२० रोजी धावली होती. नागपूरहून १४ ऑक्टोबर २०२० रोजी या सेवेचा प्रारंभ झाला. देशभरात किसान रेल्वेने शंभर फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.

गड्डीगोदाम पुलासाठी प्रतीक्षा

ट्रकच्या धडकेमुळे गड्डीगोदाम पुलावरील रेल्वे स्लिपरला धक्का लागला होता. दुरुस्तीकामांसाठी उत्तरनागपूरला जोडणारा हा मुख्य मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. तोवर नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com