नागपूर : लॉकडाउन सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर जरी विपरित परिणाम होत असला तरी वातावरणात मात्र, सकारात्मक परिवर्तन झाल्याचे चित्र आहे. वातावरणात एरव्ही बऱ्यांच प्रमाणात असलेल्या एरोसोलमध्ये (लहान थेंब, धूळ कण, बारीक ब्लॅक कार्बनचे बिट आणि वायुप्रदूषण) लक्षणीय घट झाल्याचे विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या नागरी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. यशवंत कटपातळ यांच्या संशोधनातून समोर आले आहे.
वातावरणात लहान थेंब, धूळ कण, बारीक ब्लॅक कार्बनचे बिट आणि वायुप्रदूषण पातळीवर परिणाम करणारे इतर वायू आणि प्रदूषक एरोसोल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने धुके, गिझर स्टीम, ज्वालामुखीय धूळ ही नैसर्गिक एरोसोलची उदाहरणे असून धुके, धूळ, कण वायुप्रदूषक आणि धूर ही मानवनिर्मित एरोसोलची उदाहरणे आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. कटपातळ आणि त्यांच्या एम. टेक.चे विद्यार्थी विकास पटेल आणि प्रकाश टकसाळ यांनी नासाकडून मिळवलेल्या तीन उपग्रह डेटाचा वापर करून आणि स्थानिक मॉडेलिंगचा उपयोग करून 2016 ते 2019 आणि यावर्षीच्या 25 मार्च ते 25 एप्रिल यादरम्यानच्या वातावरणाचा अभ्यास केला.
यामध्ये त्यांना चार वर्षांच्या कालावधीत असलेल्या "एरोसोल'च्या पातळीपेक्षा एका महिन्यातील एरोसोलच्या पातळीत बरीच घट असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे "एरोसोल'चे प्रमाण उपग्रह सेन्सरचा वापर करून एरोसोल ऑप्टिकल खोलीच्या अंदाजानुसार मोजले जाते. वातावरणात जेव्हा त्याचे प्रमाण कमी होते तेव्हा एरोसोल ऑप्टिकल खोली (एओडी) कमी होते आणि कणांचे प्रमाण जास्त असते तेव्हा एओडी जास्त असते.
हे सुद्धा वाचा - नागपुरातील पार्वतीनगर सील
असे आहे संशोधन
डॉ. कटपातळ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, सर्वप्रथम 2016 ते 2019 या कालावधित एरोसोल ऑप्टिकल खोली (एओडी) अंदाजित करण्यात आली. या वर्षाची सरासरी भारतासाठी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर या सरासरी प्रतिमेची तुलना 25 मार्च ते 25 एप्रिल दरम्यानच्या लॉकडाउन कालावधीच्या "एओडी'शी केली गेली. ज्यामध्ये एओडीची घट दिसून येते. यामध्ये राजस्थान, उत्तर भारत, भारताचा पूर्व भाग, दक्षिण भारत आणि मध्य भारत.
पश्चिम भागात कमी फरक दर्शविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, एरोसोल निर्देशांक, त्यातदेखील विशेषत: उत्तर भारत आणि मध्य भारतातील पॅन इंडियामध्ये लक्षणीय घट झाली आहे. एरोसोल इंडेक्स वायुप्रदूषणाशी अधिक संबंधित आहे. या संशोधनात भारतातील एरोसोलच्या पातळीचा अंदाज आहे. अभ्यासामध्ये जागतिक हवामान बदलाच्या संदर्भात एरोसोलच्या एकाग्रतेचा अंदाजदेखील आहे. अभ्यासाने असे सूचित केले आहे की, जर मानवी क्रियाकलाप कमी असेल, तर त्याचा थेट प्रदूषण आणि हवामानाशी संबंधित असलेल्या एरोसोलच्या एकाग्रतेवर परिणाम होतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.