
नागपूर : शाळा चूल व धूरमुक्त करण्यासाठी सरकारने गॅस सिलिंडरची योजना आखली. यासाठी कोट्यवधींचा निधी दिला. 1,600 वर शाळांमध्ये चुलीवर पोषण आहार तयार होत आहे. सिलिंडरचा 4.75 कोटींचा निधी खर्चच झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढा मोठा निधी शिल्लक असतानाही कोणही याकडे लक्ष न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शाळांमध्ये शालेय पोषण आहार बनविण्यासाठी पूर्वी लाकडाचा वापर होत होता. सरकारने झाडांची कत्तल थांबविण्यासाठी आणि चूल व धूरमुक्त शाळा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शालेय पोषण आहार अभियानांतर्गत 4.75 कोटी रुपयांचा निधी गॅस सिलिंडरसाठी उपलब्ध करून दिला. 2012-13 मध्ये हा निधी जिल्हा परिषदच्या कोषात जमा झाला. तत्कालीन शालेय पोषण आहार विभागाच्या लेखाधिकाऱ्यांनी पंचायतस्तरावर निधीचे वाटप केले.
तत्कालीन पोषण आहार अधीक्षकांनी शाळांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रयत्नच केले नाही. शहरातील काही मोजक्या शाळांना त्याचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे केवळ 23 लाख रुपये यातून खर्च झाले. मात्र, ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही योजना पोहोचलीच नाही. त्यामुळे आजच्या घडीला 1,617 शाळांमध्ये चुलीवरच पोषण आहार शिजविला जातो.
आज अखर्चित निधीचा हिशेब जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीच्या सभापतीकडे मांडण्यात आला, तेव्हा ही बाब समोर आली. या निधी बरोबरच पोषण आहार विभागाने 15 कोटी 64 लाख रुपयांचा निधी सरकारच्या कोषात जमा केल्याचेही समोर आले.
चौकशी करण्याची सूचना
कोट्यवधींचा निधी खर्च न झाल्याने परत गेला. विभागाने याची माहिती दडवून ठेवली. या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना विभागाला देण्यात आली आहे.
- भारती पाटील,
सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.