सिंचनाच्या क्षेत्रात होत नाही सोयाबीनचे उत्पादन, प्रशासनाचा जावईशोध

soybean damaged in irrigation sectors shows zero in government report
soybean damaged in irrigation sectors shows zero in government report

नागपूर : राज्यात सिंचन क्षेत्रात वाढ करण्याचा दावा शासनाकडून करण्यात येतो. सिंचनाची सोय असल्याची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारावर आहे. सिंचनाच्या सोयीमुळे शेतकरी दुबार, तिबार पीक घेतात. परंतु, प्रशासनाच्या दरबारी जिल्ह्यात सिंचनाची सोयच नसल्याचे दिसते. वाचून आश्चर्य वाटेल; परंतु हे खरे आहे. प्रशासनाकडून सोयाबीन नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला. यात फक्त कोरडवाहू क्षेत्राचाच उल्लेख असून सिंचनाखालील क्षेत्रातील नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. प्रशासनाने जिल्ह्यात सिंचित क्षेत्रात सोयाबीन होत नसल्याचा शोध लावल्याचा दिसते. 

जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान झालेली अतिवृष्टी, पूर, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. किडीमुळे सोयाबीनचे पूर्ण पीक हातचे गेले. प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. ९१५१३ शेतकरी बाधित झाले. प्रशासनाच्या सर्व्हेनुसार १३ ही तालुक्यात संपूर्ण क्षेत्रामध्येच नुकसान आहे. नुकसानाच्या मदतीसाठी ४६,८९,८४,१०० रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. हे नुकसान फक्त कोरडवाहू क्षेत्रातच दाखविण्यात आले आहे. सिंचित क्षेत्रातील नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. जिल्ह्यात सिंचनाची सोय अनेक शेतकऱ्यांकडे आहे. त्याचा उपयोगही त्यांच्याकडून होतो. परंतु, प्रशासनाच्या सर्व्हेत सिंचित क्षेत्रात शून्य नुकसान दाखविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com