
शुक्रवारी देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याने सर्वांसमोरच नदीत उडी मारली. रस्त्यात खड्डे पडलेत, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रस्ता लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी आंदोलकाने पोलिसांसमोरच पोहता येत नसताना नदीत उडी मारली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं आंदोलक वाहून गेला असून त्याचा शोध लागलेला नाही.