

Toll Plaza Attached After Compensation Dispute; Court Acts Against NHAI
sakal
वाशीम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमिनीची योग्य किंमत दिली नसल्याने न्यायालयात धाव घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी वाशीमचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी चक्क टोल नाकाच जप्त करण्याचा आदेश दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाशीम-रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील जांभरूण नावजी गावातून येथील बेबीताई गर्जे आणि त्यांचा मुलगा विठ्ठल यांची जमीन वाशीम बायपाससाठी घेण्यात आली. गैरकृषी असलेल्या या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.