ऐकावे ते नवलच! रुग्णांसाठीच दवाखान्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद!

esic.
esic.

अमरावती : महाराष्ट्र राज्य कामगार विमा औषधालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या रुग्णापासून कोरानाची लागण होऊ नये म्हणून येथे नवीनच शक्‍कल लढविली गेली आहे. या दवाखान्याचा मुख्य दरवाजाच रुग्णांसाठी बंद करण्यात आला आहे. आणि रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावरील उपचार चक्‍क खिडकीतून केलेजात आहेत.

रुग्णांसाठीच जर दवाखान्याचा दरवाजा उघडत नसेल तर या दवाखान्याचा उपयोगच काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून रुग्णांची तपासणी आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधी या बाहेरील खिडक्‍यामधूनच दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्या वेतनातून दरमहा ठरावीक रक्कम कपात होते. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्‍टरांकडून व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून कामगार रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक वागणूक मिळायलाच हवी.

सध्या कोरोनाच्या धास्तीने जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा इतर ग्रामीण रुग्णालय रुग्णांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. ते आवश्‍यकही आहे. मात्र राज्य कामगार विमा औषधालयात काही महिन्यांपासून मुख्य प्रवेशद्वारच रुग्णांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या खिडक्‍यांच्या बाहेर आवश्‍यक काही सूचना असलेला कागद चिकटविण्यात आला आहे. महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाही बाहेरच्या खिडकीमधूनच बोलावे लागते. एवढेच नव्हे तर डॉक्‍टरांकडून रुग्णांची तपासणी होत नाही. औषधे घेतानाही खिडकीजवळ उभे राहावे लागते. हितलाभ प्रमाणपत्रासाठीही कामगार व नातेवाइकांना खिडकीशिवाय पर्याय नसतो.

सद्य:स्थितीत येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत मात्र खिडकीच्या बाहेर कामगारांच्या डोक्‍यावर पावसापासून वाचण्यासाठी शेडसुद्धा नाही. कामगार गर्दी करतात, सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नाही, म्हणून दारच बंद ठेवून बाहेर उभे करायचे, हा या व्यवस्थेवरचा उपाय निश्‍चित नसल्याचे बोलले जात आहे.

ठळक बातमी - मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही
असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार व त्यांचे कुटुंबीयसुद्धा मनुष्यच आहेत. मग धकाधकीच्या काळात त्यांना बाहेर खिडकीजवळ उभे ठेवून दुजाभाव का केला जातो? सुरक्षेचा उपाय म्हणून डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांनी पीपीई किट्‌चा वापर करावा. पण राज्य शासनाने कामगारांसाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेकडे लक्ष्य द्यायला कुणालाच वेळ नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com