पात्र असूनही या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ, हे आहे कारण... 

news about farmar
news about farmar

वर्धा : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्‍ती योजनेत वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. या यादीतील काही शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी जुळत नाही. आधारच्या या घोळामुळे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून सध्यातरी वंचित आहेत. कर्जमाफीच्या यादीत मृत शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा घोळ असल्याचे पुढे आले आहे. 

वर्धेतील कवडू सपाट यांचा मृत्यू झाला. पण, कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नावे आले आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असतानाही सपाट कुटुंबीयांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार आहे. भगवान पिपळकार, सुलोचना धारपुरे आणि नत्थू पाटील हे मृत शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत आहेत. राज्यात हा आकडा मोठा असण्याची शक्‍यता आहे.

 
पहिल्या यादीतील 166 शेतकऱ्यांपैकी 154 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. उर्वरित 12 शेतकऱ्यांपैकी आठ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक चुकीचे, तर चार शेतकऱ्यांचा लाभ मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. 

जिल्ह्यात या प्रकाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या आठ आहे. ही संख्या सध्या कमी दिसत असली तरी राज्याचा विचार केल्यास हा आकडा मोठा होईल. यावर तोडगा काढण्याकरिता शेतकऱ्यांकडून नवा आधार क्रमांक देण्यात येत असला तरी तो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची यंत्रणा नसल्याने अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यामुळे शासनाने ही समस्या दूर करण्याकरिता तत्काळ उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे. 

दरम्यान, शासनाने वर्धा जिल्ह्यातील कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत जिल्ह्यातील दोन गावातील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्या यादीतील 166 शेतकऱ्यांपैकी 112 जणांच्या खात्यात एक कोटी पाच लाख 94 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. 
 

कर्जमाफीपूर्वीच चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सरकारकडून दुसरी यादी जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाला सुरुवात केली. पहिल्या यादीतील 166 शेतकऱ्यांपैकी 154 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले. उर्वरित 12 शेतकऱ्यांपैकी आठ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक चुकीचे, तर चार शेतकऱ्यांचा लाभ मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. या योजनेकरिता जिल्ह्यातील 61 हजार 84 शेतकरी पात्र आहेत. यापैकी 57 हजार 733 शेतकरी आधारधारक आहेत. यापैकी 46 हजार 590 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीनंतर जिल्ह्यातील 11 हजार 143 शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. 

पहिल्या यादीत चार मृत लाभार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या यादीत हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. हा पहिल्या यादीतील आकडा वर्धा जिल्ह्यासाठी लहान असला तरी राज्यात हा आकडा वाढू शकतो. 
- गौतम वालदे, जिल्हा निबंधक, वर्धा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com