चंद्रपूर : कोविडच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षासाठी आरोग्य विभागाने समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह ताब्यात घेतले होते. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाले. मात्र, आरोग्य विभागाने अजूनही वसतिगृह सॅनिटायझर करून हस्तांतरण केले नाही. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किरायाच्या खोलीत राहावे लागत आहे.
हेही वाचा - 'राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी'
जिल्ह्यातील सर्व वसतिगृह सॅनिटायझर करून हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवून शैक्षणिक विकासाचे केंद्र खुले करावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाने समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाचे सर्व वसतिगृह विलगीकरण कक्षासाठी आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, आता बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
परिणामी महाराष्ट्र शासनाने इयता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करून वर्ग सुरू केले. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा शिक्षणासाठी शहरात परतले आहे. मात्र, आरोग्य विभागाने ताब्यात घेतलेले वसतिगृह सॅनिटायझर करुन न दिल्याने विद्यार्थ्यांना भाड्याची रुम करून राहावे लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च विद्यार्थ्यांना, पालकांना परवडण्यासारखा नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून वसतिगृहातील गादी, चादर, बेडशीट यासारख्या इतर वस्तू, साहित्य सॅनिटायझर करून संबंधित विभागास वसतिगृह हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने केली आहे. शिष्टमंडळात यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांचा समावेश होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.