Buldhana : अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली

शेतमालाचे मोठे नुकसान; तेल्हारा तालुक्यात पावसाचा जोर कायम
Buldhana
Buldhana sakal

तेल्हारा : तेल्हारा परिसरामध्ये गेले चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तर कुठे-कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली. सेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच काही दिवस कायम राहिल्यास निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास फिरवून घेतल्या जात असल्याने बळीराजा चिंतेत सापडला. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.

तेल्हारा परिसरामध्ये यावर्षी कपाशी, सोयाबीन, तूर आधी पिकांची परिस्थिती समाधानकारक असताना तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये गत चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्यामुळे भांबेरी, खापरखेड, नेर, दापुरा, मनात्री, आरसुळ, पंचगव्हाण या भागातील बहुतांश पिके पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील सौंदळा, कारला, दानापूर, वारी, वारखेड, हिवरखेड या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कपाशीचे बोंडे सडू शकतात व बोंड अळीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेल्हारा परिसरातील इतर भागांमध्ये सुद्धा सतत पाऊस येत असल्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेले चार-पाच दिवसांपासून दररोज येत असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील सर्वच पिके धोक्यात आल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी शासनाने त्वरित करावी अशी मागणी होत आहे.

तलाठी दौऱ्यावर

तेल्हारा परिसरामध्ये गेले चार-पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ज्यांच्या माध्यमातून केली जाते ते तलाठी बांधव दौऱ्यावर असल्याचे समजल्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल कोण सादर करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकसानग्रस्त भागाकडे कृषी विभागाचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी बांधवांकडून सांगण्यात येत आहे. केवळ सल्ले देण्यातच कृषी अधिकारी धन्यता मानत असल्याचा सुद्धा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

पावसाचा शेतमजुरांना सुद्धा फटका

तेल्हारा परिसरामध्ये गेले चार-पाच दिवसांमधून सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे कामे थांबली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे जसे नुकसान होत आहे, त्याचप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा शेतामध्ये पाऊस असल्यामुळे मजुरी मिळत नसल्याने याचा फटका त्यांना बसत आहे. त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com