अमरावती ः कोरोनाच्या काळात सततचे दडपण व भीती आहे. कोरोनाने निर्माण केलेल्या संकटाला कुणी धार्मिक, कुणी राजकीय, तर कुणी अर्थकारणाचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मत मानसतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
कोरोनाचे संकट परत एकदा भीषण रूप धारण करीत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे परत एकदा लॉकडाउनचा सामना नागरिकांना करावा लागत असून त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मुळात गेल्या शंभर ते दोनशे वर्षांत कोणत्याही पिढीने एवढे मोठे आव्हान पाहिले नाही. त्यामुळे विविध बाजूंनी सध्या कोरोनाच्या परिणामांबाबत चर्चा सुरू झाली आहे. विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून मृतांचा आकडासुद्धा वाढत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातूनच मानसिक आजारांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.
विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते किमान मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन उपचार तरी करू शकतात, परंतु कष्टकरी तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची अवस्था वाईट झाली आहे. व्यवस्थेने ही अवस्था आपल्यावर लादली असल्याचे ते मानत आहेत. त्यामुळे हा वर्ग सर्वात जास्त भरडला जात आहे. शिक्षणक्षेत्र पूर्णच कोलमडले आहे. शैक्षणिक वर्ष हवे की शिक्षण हवे, या नादात शिक्षणसुद्धा झाले नाही व शैक्षणिक वर्षसुद्धा संपले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचे परिणाम दिसून येत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.