

Bacchu Kadu addressing thousands of farmers in Nagpur before heading to Mumbai, urging unity for flood-hit farmers’ loan waiver demand.
esakal
Summary
बच्चू कडू यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलन सुरू केले.
सरकारने चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावले आहे.
ते म्हणाले, "वरचा देव (पाऊस) पावला, आता खालचा देव (सरकार) पावतो का ते बघू."
पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू व इतर शेतकरी संघटनांनी हजारो शेतकऱ्यांबरोबर नागपुरात आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळा चर्चेसाठी बोलावलं आहे. मात्र त्याआधी बच्चू कडू यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी "वरचा देव (पाऊस) पावला, खालचा देव पावतो का" नाही बघू असे ते म्हणाले,आंदोलनात सहभागी झाल्याने मनोज जरांगे यांचेही त्यांनी आभार मानले.