

Nagpur News
esakal
नागपूर: अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर देशात १ एप्रिलपासून जनगणना सुरू झाली आहे. महाराष्ट्रात १ मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा बिगुल वाजला. भारताच्या इतिहासातील ही पहिली ‘हायटेक’ जनगणना ठरत आहे. सुशिक्षित तरुण पिढी याकडे संधी आणि आव्हान अशा दोन्ही दृष्टीने पाहत असल्याचे ‘सकाळ’ने तरुणांशी साधलेल्या संवादातून समोर आले आहे.