सरकारचा डाव प्रतिडावाने मोडून टाका, मी मुंबईला जात नसतो, त्यांचे पाय मोडले का? जरांगेंचा सवाल

Manoj Jarange Patil : शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात महाएल्गार पुकारण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यासह शेतकरी संघटनांचे नेते आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली.
Manoj Jarange Backs Bachchu Kadu Farmers Mega Protest in Nagpur

Manoj Jarange Backs Bachchu Kadu Farmers Mega Protest in Nagpur

Esakal

Updated on

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी नागपुरात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राजू शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांचाही पाठिंबा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेसुद्धा नागपूरमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले आहेत. बच्चू कडू आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांना भेटणार असून त्यात तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारचा डाव प्रतिडावाने उधळून टाका असंही जरांगे पाटील म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com