
RSS Chief at vijayadashami Says Diversity Brings Voices but Law is Supreme
Esakal
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केलं. महात्मा गांधी यांची आज जयंती असून त्यांचं स्वातंत्र्यलढ्यातलं महत्त्व अतुलनीय आहे असंही ते म्हणाले. पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं गेलं. आपल्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मोहन भागवत यांनी विविधतेत सामाजिक एकतेबद्दल बोलताना म्हटलं की, समाजात विविधता ही अनेक भांडी एकत्र असल्यासारखं आहे. त्यामुळे भांड्याला भांडं लागणार. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली आहे.