गरीब गरिबीच्या विषयावर एकत्र येत नाही : सुरेश द्वादशीवार

‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’चे प्रकाशन
प्रा. सुरेश द्वादशीवार
प्रा. सुरेश द्वादशीवारsakal

नागपूर : आजवरच्या इतिहासात कोणत्याच सरकारने भांडवलदाराविरुद्ध भूमिका घेऊन गरिबांचा विचार केला नाही. सरकार, राजकारणी आणि धर्मही भांडवलदारांच्या मुठीत असल्याने गरिबांच्या बाजूने सरकार तर नाहीच. मात्र, धर्म व त्यांचा ईश्वरही सोबत नाही. गरीब नेहमी जात, धर्म, पंथ आणि वर्गाच्या नावावर एकत्र आले. पण, गरिबीच्या विषयावर तो कधीच एकत्र आलेला नाही, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व मीडिया वॉच पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार लिखित ‘समाजवाद : आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे मीडिया वॉचचे अविनाश दुधे उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, जगात कुठेही गरिबांची क्रांती झालेली नाही.

प्रा. सुरेश द्वादशीवार
महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप

गरिबांमध्ये गरिबीविषयी चीड निर्माण झाल्याशिवाय ही क्रांती अशक्य आहे. मात्र, गरिबाने गरिबीच्या विषयावर एकत्र येऊ नये म्हणून भांडवलदारांनी मध्यमवर्गीय समाजातील आपल्या प्रतिनिधींना चांगले वेतन देत याची उत्तम व्यवस्था निर्माण केली आहे, असेही ते म्हणाले.

समाजाचा जागतिक अभ्यास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आाल्याचे, डाॅ. गिरीश गांधी यांनी सांगितले. महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान जगाला मान्य असूनही देशात त्याचा प्रभाव दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com