अरेरे...कांदा लागवडीचाही होणार वांदा!

onion
onion
Updated on

वाशीम : यंदा कांद्याच्या दराने शंभरी पार केली. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या घामाला योग्य मोबदला मिळाला. ही बाब पाहता जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र वाढीचा अंदाज होता. मात्र, वातावरणातील बदलाने कांद्याची रोपे जळाली आहेत. तर शेतातील उभ्या रोपांवर धुक्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे ही रोपे देखील खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडीचाही वांदा होतो की काय? असा प्रश्‍न कांदा उत्पादकांसमोर उपस्थित झाला आहे. 

जिल्ह्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा उन्हाळ्यातील एप्रील -मे महिन्यात काढणीला येतो. तसेच या कांद्याची वर्षभर साठवणूक सुद्धा शक्य असते. कारण, उन्हाळी कांद्याचा दर्जा चांगला असल्यामुळे तो दीर्घकाळ चांगला राहतो. हीबाब पाहता जिल्ह्यातील शेतकरी खरिपातील कांदा लागवडीपेक्षा रब्बी हंगामात कांदा लागवड करून, उन्हाळ्यात कांद्याची काढणी करतो. रब्बी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कांद्याचे बीज नोव्हेंबर महिन्यातच टाकल्या गेले होते.

ढगाळ वातावरण व धुक्याचा परिणाम
परतीच्या पावसानंतर सारखे ढगाळी वातावरण, धुके, वातावरणातील दमटपणा आदी कारणांमुळे कांदा बिजाच्या उगवणशक्तीवर परिणाम झाला. तर दमटपणामुळे कोवळ्या रोपांची चांगली वाढ झाली नाही. त्यामध्येही जी रोपे तग धरून उभी आहेत. ही रोपे धुक्यामुळे पांढरी पडली असून, कांद्याची पात पूर्णतः खराब झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अपेक्षीत केलेली लागवड देखील या रोपांपासून होणे शक्य नाही. तर खुले गावरान कांदा बीज देखील उपलब्ध होत नसल्याने कांदा उत्पादक चिंतीत झाले आहेत.

रोपे जळाल्याने फेककांद्यावर भर
यंदा कांद्याला 100 रुपयांवर प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कांदा लागवड वाढीचा अंदाज होता. मात्र, कांद्याची रोपे खराब झाली. तसेच आता रोप टाकल्यास लागवडीला येण्यास विलंब लागेल. यामुळे कांदा उत्पादक फेककांदा पद्धतीने कांदा उत्पादनाला पसंदी देत आहेत.

बिजोत्पादन लागवडीलाही झळ
जे शेतकरी कांद्याचे बीज उत्पादीत करतात. त्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या अर्ध्यावरच काद्यांची लागवड करावी लागते. मात्र, यंदा सारखे ढगाळी वातावरण, वातावरणात आर्द्रता व वारंवार धुके पडत आहे. त्यामुळे बिजोत्पानासाठी लावलेल्या कांद्याची पात देखील पिवळू पडून वाळत आहे. परिणामी, बिजोत्पादक शेतकरी चिंतीत झाला आहे.

दरवाढीचा लागवडीवर परिणाम
यांदा कांद्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत चांगला दर मिळाला. मात्र, या कालावधीत शेतकऱ्यांकडे कांदाच राहत नाही. तर खरिपातील नवीन कांदा बाजारात येतो. मात्र, पावसामुळे खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने दरवाढ झाली. ही दरवाढ पाहता अनेकांनी कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्यातील गत रब्बी हंगामातील कांदा लागवड
वाशीम ....50 हेक्टर / रिसोड ...........105 हेक्टर
मालेगाव ..60 हेक्टर / मंगरुळपीर ......30 हेक्टर
कारंजा ....40 हेक्टर / मानोरा ............30 हेक्टर
एकूण ..........................................315 हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Marathi News Esakal
www.esakal.com