शेतकरी आंदोलनाची धग यवतमाळातही; 'बंद'च्या हाकेला राजकीय, सामाजिकसह शेतकरी संघटनांचा पाठिंबा

political and farmers association support to farmers agitation
political and farmers association support to farmers agitation

यवतमाळ : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मंगळवार (ता. आठ) भारत बंदची हाक दिली आहे. राजकीय, सामाजिक, शेतकरी संघटनांचा सहभाग आंदोलनात राहणार आहे.

मुंबई बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समिती संचालकांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी बंद पुकारला आहे. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी व पणन कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे. मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता राज्यातील इतर बाजार समित्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यभर बाजार समिती बंद राहणार आहे. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. रब्बीच्या नियोजनासाठी शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत आहे. शेतकऱ्यांना अडचण नये म्हणून याकाळात शेतकऱ्यांनी शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने आणलेले कृषी कायदा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. यासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुबंई बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. यानंतर जिल्ह्यातील संचालकांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
-प्रवीण देशमुख, संचालक, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समिती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com