राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागली ग्रामीण रस्त्यांची वाट 

National highway
National highway

सावली (जि. चंद्रपूर) ः गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी गौण खनिज साहित्य आणण्यात येत आहे. जडवाहनाने हे साहित्य आणण्यात येत असल्याने ग्रामीण रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या काही वर्षांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, भार वाहन्याची क्षमता नसलेल्या डांबरी ग्रामीण रस्ंत्यावरून  सतत ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्याची एक बाजू दबली जात आहे. त्यावर खड्डे तयार होत आहेत. 

सावली तालुक्‍यातील कोंडेखल- घोडेवाही रस्त्याची जडवाहतुकीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. सावली तालुक्‍यातील अनेक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले. मात्र, जडवाहतुकीमुळे या रस्त्यांची वाट लागली आहे. तालुक्‍याच्या अनेक भागांतून वाळू, माती, मुरुमाची वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त साहित्य आणले जात आहे. 

सध्या राष्ट्रीय महामार्ग ९३० चे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. हे काम गडचिरोली, सावली ते मूलपर्यंत सुरू आहे. या कामासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मुरुम, माती आणली जात आहे. ही वाहतूक हायवा ट्रकद्वारे होते. तीही क्षमतेपेक्षा जास्त. याचमुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  


संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com